Wednesday 30 December 2015

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ! तुमच आणि आमच अगदी सेम असत !!

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत !
तुमच आणि आमच अगदी सेम असत !!

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वाटतात ?
कव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे 
फसल्या तर फसु दे 

तरीसुद्धा
तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत !
तुमच आणि आमच अगदी सेम असत !!

मराठीतून इश्श्य म्हणून
प्रेम करता येता
उर्दू मधे इश्क़ म्हणून
प्रेम करता येता

व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येता
कॉन्वेन्ट मधे शिकलात तरी
प्रेम करता येता 

सोळा वर्षे सरली की अंगात फूला फुलू लागतात
जागेपणी स्वप्नचे झोपाळे झुलु लागतात
आठवता ना ?

तुमची माझी सोळा जेव्हा
सरली होती
होदी सगळी पाण्याने
भरली होती 

लाटांवर बेभा
न होऊन 
नाचलो होतो
होडीसकट बुडता बुडता
वाचलो होतो 

बुडलो असतो तरी सुद्धा चालला असत
प्रेमानेच अलगद वार काढला असत
तुम्हाला ते कळला होता
मला सुद्धा कळला होता
कारण 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत !
तुमच आणि आमच अगदी सेम असत !!

प्रेमबिम झूठ असता
म्हणणारी माणसा भेटतात
प्रेम म्हणजे नुसत 
म्हणणारी माणसा भेटतात
असाच एक जण
चक्क मला म्हणाला
आम्ही कधी बायकोला
फिरायला नेला नाही
पांच मुले झाली तरी
प्रेम बीम कधी सुद्धा केला नाही
आमच् काही नङला का?
प्रेमाशिवाय अडला का?
त्याला वाटला मला पटला
तेव्हा मी इतकच म्हणल
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत !
तुमच आणि आमच मात्र सेम नसत !!
तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चॉकलेट अर्ध अर्ध
खाल्ला असेल जोडीने।
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासंतास फिरला असाल 
झंकारलेल्या सहवासाने
तिच्या कुशीत शिरला असाल
प्रेम कधी रुसने असत 
डोळ्यानेच हसण असत 
प्रेम कधी भांडण सुद्धा
दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असत
घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत !
तुमच आणि आमच अगदी सेम असत !!



कविवर्य मंगेश पाडगावकर। 

Wednesday 16 December 2015

PathFindeRs Very First TreK. HarishchandraGad

नमस्कार मित्रहो ,
     काही जुन्या आठवणींना उजाळा देऊया।
       साधारण ७ -८ वर्षांपूर्वी आमचा पाथफाइंडर्स चा पहिलाच आणि जिथे पाथफाइंडर्स हा ग्रुप तयार झाला तो ट्रेक होता "हरिशचंद्रगड़" आमचा पहिला वहिला ट्रेक आम्ही सहा लोक होतो। सगळे शाळेतले लोक,पहिल्यांदाच ठरल आणि मग एकदम  भरभक्कम तयारी झाली खच्चून सामान बॅग वैगरे भरून आम्ही सकाळी सकाळी निघालो सगळेच अगदी उत्साहात. आमचा प्लान ठरला होता तसे रस्ते पाहून ठेवले होते , पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणार्‍या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गाव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) नशिकफाटा ते खीरेश्वर प्रवास एकदम दणक्यात झाला, मग खीरेश्वर पासून चालायला सुरुवात केली पायवाट म्हणजे चांगली होती. आम्हाला ७ टेकड्या पार करायच्या आहेत एवढच माहिती होत.










आमच्या मधे एक जण तब्येतीने एकदम छान ( थोडक्यात जाड़ ) असा एक जण होता हर्षद त्याच नाव, निखिल आवारी नावाचा एक मित्र थोड्याश्या अवघड रस्त्याने वर गेला मगोमाग हा बंड्या !!.....तिथे तो अशक्य अश्या रीतीने गंडला त्याच्या पुढे निखिल बारीक़ असल्या मुळे पटकन चढ़ून गेला
, हा बंड्या एका अश्या जागेवर गेला की त्याला खालीही येता येईना आणि वरही जाता जाइना। ... बसला अडकून। .... मग जो भोंगा चालू झाला बापरे!!! ...


... माला हेलीकॉप्टर बोलवा !!! मी इथून हलणार नाही !!!!! माला हेलीकॉप्टर बोलवा!!!!!!,,,,,बराच वेळ त्याची समजूत काढण्यात गेला आणि आमच्यातला एक जण  त्याच्या इथे जाऊन त्याची बॅग घेऊन त्याला कसाबसा खाली आणला आणि बाजूच्या वाटेने त्याला घेऊन वर आलो मग बऱ्याच वेळाने आम्ही गडावर पोहोचलो .साधारण दुपाऱनंतर  ( नेमकी वेळ आठवत नाही ) गडावर पोचलो असावो . गेल्या वर निवांत आराम केला. समोर राहायला म्हणून एक गुहा शोधली आणि ती इतकी भारी होती की क्या बात !!! ...
१ बेडरूम हॉलची गुहा 
... तिला दोन रूम होत्या एक बेडरूम एक हॉल आणि एक व्हरांडा झोपायची आता सोय झाली होती कोण कुठे झोपेल हे ही ठरवून घेतला ...... हर्षद आणि निखिल आतमधे (बेडरूम ) मी नचिकेत मधल्या गुहेत ( हॉल मधे ) आणि सुबोध आणि  रोहित बाहेर (व्हरांडा) अशी आमची १ बेडरूम हॉल ची गुहा !!!!  ....... रात्रि डब्बे खालले आणि कदाचित  खिचड़ी केलि असावी रात्री मस्त हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे तिथे गेलो.
सुबोध, संत्या( गावतला मुलगा ) आणि रोहित 
 मोकळ्या आकाशात ग्रह तारे चांदण्या पाहण्याची मज्ज्या काही औरच !!!....मग रात्रि सगळे गुहेत परतलो आणि झोपलो रात्रि मधेच आतल्या गुहेत असलेल्या हर्षद मुजुमदार नावाच्या त्या ७०-८० किलोच्या देहाला बाहेर जायची हुक्की आली बैटरी वैगरे तत्सम गोष्टींना घ्यायचे कष्ट न घेता तो तसाच उठला आणि निघाला मधल्या गुहेत मी झोपत असल्या मुळे मला ओलांडून ज्याण्यापलीकडे त्याच्या कड़े दूसरा मार्ग नव्ह्ता मग काय जे व्हायला नको तेच झाले मी झोपेत असताना माझ्या नको त्या जागेवर पाय दिला " मेलो !!!!! मेलो !!!!"  छोटा निखिल मेला !!!!!!!! " मी खुप म्हणजे खूपच जोरात ओरडलो की सारी मंडळी पुढच्या २ मिनटात जागी झाली , मग त्याला ज्या शिव्या पडल्या की बस !!!
..........मग दुसऱ्या दिवशी काहीसा चहा नाश्ता करून परत हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात गेलो.
मग थोडेच पुढे एक केदारेश्वर  मंदिर ( छोटीशी गुहा ) गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरेभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे त्यामधे बर्फतुल्य पाणी .......आणि मधोमध एक शिवलिंग.....


                                 बापरे काय थंड पाणी होते तिकडे !!!! ..
.....सगळ्यांनी त्या बर्फा सारख्या थंड पाण्यात यथेच्छ अंघोळी आटोपल्या! ....... आमच्या आधीच्या प्लान नुसार आमच्या कड़े हा शेवटचा दिवस होता कारण तिसऱ्या दिवशी आम्हीं निघायच्या बेतात् होतो....पण आम्हाला तो गड , ती जागा खूपच आवडली. खूपच रहावेसे वाटत होते ......मग असा ठरल की आपला सामान पण बरेच शिल्लक आहे ( पहिलाच ट्रेक असल्या मुळे सगळ्यांकडे खुपच सामान होता जवळ जवळ सगळ्यानीच जास्तीचे सामान आणले होते कोणाला पावशेर कांदे सांगितले तर अर्धा किलो आणले होते,तसाच प्रकार बटाटे आणि पोहे वैगरे बाबतीत झाला होता मग आता सामान आहे ते घेऊन परत कसा जायच  ?? ( चला तसेही बरेच झाले आंम्हाला आपल  घरी सांगायला कारणही झाल. ) आम्ही असा ठरवला की आता आपला मुक्काम आपण दोन दिवस वाढवुया आणि हे घरी आत्ताच सांगायला पाहिजे मग आमच्या मधला सगळ्यात साधा सरळ आणि हुशार मुलगा सुबोध जोशी याच्या घरी पहिला फ़ोन करून सांगायचं ठरल आणि त्याच्या घऱचे बाकीच्यांच्या घरी सांगतील असे ठरले. आम्ही राहात होतो तिकडे रेंजचा प्रॉब्लम असल्या मुळे तिथे जवळच तारामती नावाच एक पठार होते तिकडे रेंज येते ऎसे कळले तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो मग आम्ही ४ जण निघालो तारामती वर.
लावला फ़ोन ,,,,ट्रिंग ट्रिंग
सुबोध : हेलो दादा मी मनु बोलतोय।
सुबोधचे बाबा :   बोल रे ! केव्हा पोचलात गडावर !!
सुबोध : काल दुपारी पोचलो ......वगैरे ..वगैरे . ......
सुबोधचे बाबा : काय  जेवलात ....वगैरे .वगैरे .. ......
(असा काही वेळ संवाद झाल्यानंतर )
सुबोध : दादा , आम्ही आणखी दोन दिवस गडावर राहु का ?
सुबोधचे बाबा : ( काही सेकंद पॉज़ )....... नको। 
सुबोध : दादा आम्ही गडावर आणखी दोन दिवस राहतोय !!! खायच खूपच सामान राहिलय आहो !!!
सुबोधचे बाबा : ( परत एक मोठा पॉज़ ) आणि काहीतरी म्हणाले.
सुबोधचे बाबा काय म्हणाले ते आता आठवत नाही पण सुबोध ने बराच वेळ पटवल्या नंतर शेवटी आम्हाला परवानगी मिळाली आणखी कोणीतरी फोन लाउन घेतला आणि बाकीच्यांच्या घरी कळवा असे सांगून आम्ही निघालो..........निघेपर्यंत आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला  आणि कोणाच्या बैटरी आणायच्या पण लक्षात नाहीं राहिल जवळ जवळ अंधार पडलाच होता आणि त्यात रस्ता सापडेना........मग सगळ्यात पुढे नचिकेत एक सूरा घेऊन दिसतील तेवढी झाड़े उडवत वाट बनवत चालला होता त्यामागुन आम्ही सगळे , चंद्र होता त्यामुळे बऱ्यापैकी चांदण होते आणि तेवढ्यात सुबोधचा एक पाय दोन दगडांच्या मधे जवळ जवळ ३-४ फूटाच्या एका फटित गेला आणि तो पडला.... .... ... खूपच जोरात तो कळवळला तिथे त्याचा तळपाय पूर्ण पणे मुडपला होता हलकेच पाय बाहेर काढला आणि जरा वेळ तिथेच बसलो मग थोड्या वेळाने तश्याच अंधारात एक हाथ माझ्या खांद्यावर दूसरा दुसऱ्याच्या खांद्यावर असे जरा मंदिरा जवळ पोचलो तेव्हा पोराना आवाज दिला , लगेच त्यांनी पण आवाज़ ऐकला मग आम्ही कसेबसे पोचलो एकदाचे मंदिरा जवळ आणि लोकाना खुशखबर पण दिली , आम्ही तिघे कसेबसे गुहेत पोचलो तेव्हा त्याच्या पाय खूपच सुज़ला होता मग त्याला टाइगर नावाचा बाम लावला आणि क्रीप बैंडेज बांधले त्याला खूपच वेदना होत असाव्यात कारण तो सुझलेला पाय पाहूनच आम्हाला कळल होत की पायाला खुप जोराचा झटका बसला आहे. सगळे काही वेळाने झोपले मधे रात्रि एकदा सुबोध उठला बैंडेज काढला आणि तो टाइगर बाम पाण्याने धुतला कारण तो बाम इतका डेंजर होता की लावल्या नतर काही वेळाने त्याच्या पायाला इतके झणझण होत होते की शेवटी त्याने बाम धुतला आणि पुन्हा झोपला.
     तिसऱ्या दिवशी सकाळी पायाची सूज थोड़िशी कमी झाली होती पण तो चलायच्या अवस्थे मधे नव्हता मग हर्षद त्याच्या सोबत गुहेत थांबला आणि आम्ही कोंकणकड्यावर जायचा बेत केला चाहा नाश्ता झाल्यावर आम्ही कोकणकड्यावर गेलो अप्रतिम दॄश्य  !!!!!!!
 
 

 
अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट . संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे खोल दरी आणि सूर्यास्त वाहह मस्तच होता तो कोकणकड़ा।
निखिल ( २ ) , नचिकेत 
        दिवसभर भटकलो आणि मग संध्याकाळी परत गुहेत आलो सुबोधच्या पायाला थोड़ा आराम मिळाला होता पण त्याचे दुखणे काही थांबत नव्हते परत एकदा बाम लावला आणि धुतला ........ त्या दिवशी त्याला आराम मिळाला हे बरेच झाले कारण पाचव्या दिवशी आम्ही निघणार होतो....... बऱ्यापैकी सामान पण संपले होते.
         मग पुढच्या दिवशी आम्ही सगळे आवरले आणि निघालो सुबोधचा पाय दुखतच होता पण  दुखणे थोड़े कमी झाले होते आणि हळु हळु थांबत थांबत निघालो सगळ्यात पुढे मी आणि रोहित आम्ही आपले नेहमीच्या स्पीड ने निघालो पुढे मागे सुबोधचा पाय दुखावल्याने तो हळु चालत होता , नचिकेत आणि निखिल सुबोधसोबत असल्याने तेही हळू आणि हर्षद आपल्याला यांच्या सोबत संथ गतीने जायला मिळेल आता कोणी आपल्याला पळवणार नाही या आनंदात निवांत चालत होता , मग थोड़े पुढे गेल्यावर आम्ही म्हणजे मी आणि रोहित ( बालेकिल्याच्या वाटेने ) चुकीच्या रस्त्याने गेलो आणि एक जागा अशी आली की आणखी थोड़े पुढे गेलो असतो तर डायरेक्ट दरित!!!! मग मागे वळून पाहिले साधे कुठले कुत्रे पण दिसत नव्हते। मग आम्हाला कळल की आपण खूपच वाईट चुकलोय आणि वाट पहात बसलो बाकीच्यांचि पण अर्धा तास झाला तरी कोणी आले नाही आम्हाला वाटले की सगळे एकत्र चुकले पण चुकलो फ़क्त आम्हीच होतो बाकीचे कुठल्याश्या दुसऱ्या वाटेने गेले होते मग आम्ही मागे गेलो पण कोणीच दिसेना खुप आवाज दिले लोकाना पण काहीच पत्ता नाही सगळ एकदम  सामसुम  मग मात्र थोडिफार टरकली , आम्ही कोणी गावातले लोक दिसतात का ते पाहू लागलो पण कोणीच दिसेना शेवटी रोहित म्हणाला आपण असेच इथून खाली उतरुया जिथे पोचेल तिथे पोचू खाली गेल्यावर पाहु काय ते  ! पण तसे जाणे खुप रिस्की होते म्हणून मग ते  रद्द केले , तसेच आम्ही आलो त्या वाटेने माघारी निघालो येता येता दुरवर २ गावातले लोक दिसले आणि मग त्यांना हातवारे करुन रस्ता विचारला आणि त्या वाटेने  निघालो थोड़ेच खाली आल्यानंतर आमची बाकीची गॅंग वरुन आम्हाला दिसली नशिबाने ते हळूहळू चालत असल्यामुळे त्यांच्या पासून आम्ही तासा दीड तासांच्या अंतरावर होतो. मग वरुन  आवाज दिला आणि मग ते थांबले आम्ही गेलो भेटलो आम्ही खुश तेहि खुश !!! आणि इकडे यांना भलतच टेन्शन कुठे गेले हे दोघे ? कुठे पडले की काय ?? काय झाल ? वगैरे  वगैरे.....
          पण मग त्यानंतर सर्व जण एकत्रच चालू लागलो मग आपल्या या ग्रुप चे नाव काय ठेवूया यावर खुप नावे सुचवली गेली मग असाच सगळ्यांचा विचार लक्षात घेता शेवटी एक नाव सगळ्यांना आवडले आणि ते "पाथफाइंडर्स" असे  ठरविण्यात अाले।    
हर्षद , रोहित ( दिसत नाहीये :P ),निखिल (१),निखिल (२), सुबोध 
          जवळ जवळ ५-६ तासाने खाली पोचलो रात्रि मिळेल त्या  गाडीने पुणे गाठले मग दुसऱ्याच दिवशी सुबोध डॉक्टर कड़े गेला आणि तेव्हा कळले पायाच्या लिगामेंट्स ब्रेक झाल्या आहेत!!!! मग काय आल्यावर थोड्या फार शिव्या आणि गडावर केलेली खुप मज्ज्या २-३ दिवसांचा ठरलेला ट्रेक ४-५ दिवसांवर गेला असा आमचा पहिला ट्रेक संस्मरणीय ठरला !!!
ट्रेक सदस्य।
१) सुबोध जोशी
२) नचिकेत आराध्ये
३) निखिल आवारी
४) रोहित गडेकर
५) हर्षद मुजुमदार
६) निखिल चौधरी

  

Tuesday 15 December 2015

SudhaGad !



सुधागड !


            हा एक खुप छान असा महाराजांच्या नजरेतला आणि रायगड या गड़ाशी मिळता जुळता असलेला , यावरील टकमक टोक , बुरुज थोड़े फार रायगडा सारखे आहेत ..पालीपासून भिरा कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे ठाकूरवाडी येथून एका सोप्या पायवाटेने गडावर २-३ तासात आपण पोचतो. ठाकूरवाडीतून वर जाताना मध्ये दोन लोखंडी शिडया लागतात .
         आम्ही चार जण होतो. दुपारी २-३ च्या सुमारास निघालो निगडी भक्ति-शक्ति येथून खोपोली ST पकडली. साधारण ४-३० ला आम्ही खोपोलित पोचलो. तिकडून पाली ची ST पकडली.पाली मधे आम्ही ६.३० ला पोचलो. ७. १५ ला पुढची पाच्छापूर ची ST आहे कळले मग नाश्ता केला आणि ST ची वाट पाहत बसलो.
मग तिथेच इंटरनेट वर गडाची माहिती वाचत असताना एक ब्लॉग दिसला "हॉन्टेड सुधागड " ती लिंक अशी :-
http://indianhorrortales.blogspot.in/2013/04/the-haunted-encounter-on-sudhagad-fort.html
आम्ही ती ओपन केली सगळे जमा होऊन बसलो स्टॅंड वर आणि चालू केला वाचायला, तेव्हा बऱ्यापैकी अंधार पडला होता, ती ७ मुलांच्या ट्रेक ची एक कथा होती वाचत वाचत मधे असे आले,
"It was an Amavasya (New Moon) night and our path was quite eerie"
         इथे आमची थोड़ी टरकली कारण त्या दिवशी पण अमावस्याच होती. मग वाचत वाचत त्या भूतांच्या वातावरणात गेलो आणि बऱ्यापैकी फाटली, तुम्ही पण वाचा हा ब्लॉग मज्ज्या येईल. त्यामधे बॉब्या (दिनेश) हा आमच्या पासून थोड़ा दूर बसला होता आणि आम्ही काय वाचतोय ते मुद्दामून ऐकत नव्हता ,( कदाचित जास्तच टरकला असावा ) . मग सगळा ब्लॉग वाचुन झाल्यावर आमच्या एकमेकांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. मग नंतर त्या ब्लॉग च्या कमेंट्स वाचायला चालू केला आणि जेवढी भीती वाटली होती ती सगळी पळुन गेली.मग जाम हसलो ज्याने हां ब्लॉग लिहिला होता त्यावर. मग थोड्या वेळाने ST आली आणि आम्ही निघालो पाच्छापूरला. साधारण ८.३० -९.३० च्या दरम्यान आम्ही पोचलो आणि आम्ही जे रात्रि गड चढणार होतो ते रद्द केल आणि तिथेच मुक्काम करायचा ठरवल मग रहायची सोय पण लगेच करुन टाकली, ज्या ST मधून आम्ही आलो होतो ती तीकडेच राहणार होती. मग जरा गप्पा मारल्या ड्राइवर सोबत जमवली गट्टी आणि त्याला म्हणालो की दूसरी कड़े कुठे जागा नाही मिळाली तर ST मधे राहु तेहि म्हणाले "रहा ! रहा !! एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाची मदत नाहीं करणार तर कोण करणार!!!!" मस्त होते ते पेण बस स्टैंड चे बहुचर्चित ड्राइवर "वसु पाटिल". त्यानेच आमची पाण्याची आणि चहा,सूप करायला जळन याची एका गावातल्या माणसा कडून सोय केली.
.

मग चहा बिस्किट आणि काही वेळाने सूप झाले आणि नंतर शेवटी आम्ही वरुण ने आणलेल्या कचोरया हाणल्या, केवढ्या होत्या त्या वाहह!!!!! :d ( झाल काय वरुण ने आम्हाला सांगितला होता की माझ्या कड़े खुप कचोरया आहेत अापले पोट भरेल आणि जेव्हा त्या बाहेर आल्या. हा! हा!! हा!!! . कचोरया कम पाणीपुरीच्या पूरया होत्या आणि मग आम्ही सूप पिल्याने बऱ्यापैकी पोट भरले होते पण आण्ण्य़ाला (अभिराज ) भूक लागलीच होती मग त्याला तसाच कचोरया खायला घालून थोडेफर सटर फटर खाऊन बसवला ) .अमावस्या असल्याने आकाश अगदी झकास दिसत होता मग उल्का पहात गप्पा मारत रात्रि ११. ३० - १२ वाजता झोपायला ST गाठली. ड्राइवर ने आमच्यासाठी गाड़ी लॉक केलि नव्हती मग गेलो सगळ्यानी जागा पकडली आणि झोपलो.
          पहाटे ५. १५ लाच ड्राइवर आणि कंडक्टर आले पटापट उठलो आणि आवरुन आभार मानून खाली उतरलो मग मस्त फक्कड़ चहा केला आणि ७. ३८ ला आम्ही गडावर जायला निघालो. छान होता वातावरण जास्त थंडीपण नव्हती आणि गार वारा सुटला होता .
तसा पाहिला तर गड खुप मोठा आहे. वर खुप मोठे पठार आहे. जाताना दोन लोखंडी शिड्या लागतात.

थोडेच पुढे एक बुरुज लागतो तिथे जायला एक छोटासा अंधारा जीना आहे. त्या जिन्यामधे भल्या मोठ्या पाली आहेत , झाल काय आम्ही आपले जात असताना एक भयंकर दिसणारी, माझ्या हाताच्या पंज्या पेक्षाही मोठी असणारी एक पाल वाटेत शांत पणे बसली होती, तिची नखे एकदम अणुकुचिदार होती. आम्ही आपले २-३ फोटो काढले आणि बुरुजा वर जायला निघालो तिकडे जायला ती एकच वाट होती, मग आम्ही...... का........... कु..........करत करत आणखी पुढे निघालो सगळ्यात पुढे मीच होतो अंधार होता आणि थोड़े पुढे जाताच बॉबी (दिनेश) ला बैटरी लावायला सांगितली आणि त्यानी बैटरी लावताच जी पोरे ओरडली सगळी सुसाट परत एकदम वरर !!! मी २ मिनट तसाच स्तब्ध !!!!!! माझे दोन्ही हाथ दोन्ही भिंती फ़क्त पासून ३० -३५ सेंटीमीटर वर असतील. मी माझे हाथ दोन्ही भिंतीवर ठेवणार इतक्यात बैटरी लावली जर ठेवले असते तर दोन्ही हातात दोन त्या तिथे बसलेल्या  भल्यामोठ्या पाली आल्या असत्या !!!!!
तसाच आलो आम्ही माघारी बुरुज पहायची कोणाची इच्छा राहिली नाही त्या पाली पाहुनच पोट भरले ........ तिकडे आम्हाला तरी ४-५ पाली दिसल्या आणखी किती होत्या कोणास ठाऊक !!!! तिथून जसे वर आलो तीकडे थोड़ेच पुढे एक पिण्याच्या पाण्याच टाक होता वर थोड़े पुढे गेल्यावर एक कोरडा ओढ़ा लागला एव्हाना उन बरेच वाढले होते मग थोड्या वेळाने पायऱ्या चालू झाल्या काही पायऱ्या चढल्यावर बराच वेळ चालल्या नंतर एकदाचे आम्ही गडावर पोहोचलो ११.०० वाजले होते.वरती खुप मोठे पठार आहे . सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर इकडे एक विशाल बुरुज आहे .वाड्याच्या मागील बाजूस एक शिवमंदिर आहे. येथे आपल्याला अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात. या मंदिराच्या आसपास जंगलात काही अवशेष आढळून येतात. तसेच मंदिराच्या आणि वाड्याच्या मध्ये एक चौकोनी आकाराची विहीर आहे.
 
हे  सर्व पाहून झाल्यावर आम्ही तिकडच्या वाड्यामधे बस्तान टाकल. तिकडे भरपूर माकडे आहेत जास्त त्रास नाही दिला त्यांनी आंम्हाला पण त्यांना हुस्काउन लावण्यात थोड़ा फार वेळ गेला. मग आम्ही खायच्या तयारीला लागलो. पोहे खायची लोकांना इच्छा झाली , मग पोहे केले 
   
आणि खाऊन झाल्यावर एक झोप काढली. झोप काढत असताना अर्धे लक्ष माकडांकडे, दुपारी ४ वाजता सगळे उठले आणि मग चहा केला. पाणी सगळे संपले होते, पाणी भरायला जवळच थोडेसे उतरल्यावर दोन टांके होते , आम्ही गेलो खाली भांडी घासली ,पाणी भरले पाणी भरायच्या इथे डाव्या बाजूला मोठे बुरुज तिकडेच घळीत प्रतिध्वनी येत होता शिट्टी वाजवली पुनः अगदी छान ऐकू येत होती.  
 
मग मी बासरी सोबत घेतलीच होती बसलो थोडीफार वाजवली आणि निघालो. परत वाड्यावर आल्यावर एक नविन ग्रुप दिसला त्यांचा इरादा आमची चूल घ्यायचा होता आंम्ही लगेच खिचड़ी करायला घेतली आणि आमची आमची चूल ताब्यात घेतली :) अर्थात दिली असती त्याना पण उगाच मग नंतर उशीर झाला असता आम्हाला मग आमच उरकल खिचड़ी झाली , वरुण ने मस्त पापड़ भाजले ,काही वेळातच आम्ही खायला बसलो आणि यावेळेला खिचड़ी भलतीच तिखट झाली आण्ण्य़ाने (अभिराज) आणलेला मसाला एकदम तिखट होता तरीही मी दोन चमचेच टाकला त्याने आणखी अर्धा चमचा नंतर वाढवलाच ती झाली तिखट !!! आणि अंदाज पण चुकला, खिचड़ी थोड़ी जास्तच झाली चांगलीच मज्ज्या झाली आमची. जेवणे झाली आता बाहेर पठारावर जायचा बेत केला. मक्याचे कणिस आणले होते ते बॉबी(दिनेश) आणि वऋण ने भाजले त्याला लिम्बु मिठ वगैरे लावले आणि ते घेऊन आम्ही रात्रीच्या अमावस्येच्या अंधारात पठारावर गेलो.तिकडे पहुडलो खुप साऱ्या उल्का पहिल्या , बहुतेक रोज रात्रि उल्का पडत असाव्यात शहरात आजूबाजुला उजेड असल्यामुळे त्या दिसत नसाव्यात. त्या दिवशी पण आम्ही रात्रि १२ वाजता परत वाड्यावर गेलो गप्पा मारत कधी झोप लागली कळल पण नाही. झोपताना ठरवल की सकाळी ६.३० ला निघायच आणि ९.३० ची ST पकडायची.
           तिसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोबाइल चा गजर वाजू लागला आणि जाग आली सगळ्या बैग्स भरल्या आणि ७. ३० ला निघालो जाताना आलो त्या वाटेने निघालो सोबत गडावरच एक कुत्रहि सोबत निघाल. ते कुत्र सोबत निघाल खर पण ते आम्हाला वाट दाखवत नव्हत उगाच आमच्या सोबत आमच्या मधे मधे करत होता कदाचित त्याला भूक लागली असावी पण आमच्या कड़े द्यायला काहीच शिल्लक नव्हत. संत्री होती पण ते त्याला तोंडाही लावत नव्हत मग कसबस ते शिडी पर्यन्त आले आणि शिडी उतरायलाच तयार नाहीं किती त्याला यु यु केल तरी तिथेच !!!! मग आम्ही निघालो त्याला सोडून. आम्ही बरोबर ९. ०० वाजता खाली पोहोचलो आणि १०-१५ मिनिटातच ST आली आम्ही पालीला आलो तिकडे बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले आणि स्टॅंड वर मस्त चहा आणि वडापाव खाऊन निघालो. पुण्याची गाड़ी खुप वेळाने होती मग आम्ही पुन्हा खोपोलीला जायचा ठरवल आणि खोपोलीला पोहोचलो , तिथून पुण्याची गाडी मिळायला बराच वेळ लागला शेवटी मग उभे राहून जाऊया ऎसे ठरवले आणि निघालो गम्मत अशी की पहिल्याच स्टॉपला मला बसायला जागा मिळाली बाकीच्याना पण लगेचच जागा मिळाली. आम्ही दुपारी ३ वाजता पुण्याला पोहोचलो.
       असा आमच्या ट्रेकिंग च्या यादि मधे आणखी एक छान ट्रेक जमा झाला.
 आलेले सदस्य :
१) दिनेश आडकर
२) अभिराज कचरे
३) वरूण आघारकर
४) निखिल चौधरी  


    The PathFindeRs