Tuesday 29 November 2016

The Valley of Shadows ................Sandhan Valley ....!!!

आठवतो तो पाहिलेला चांदण्यासोबतचा चंद्र हरिश्चंद्रावर ,
कोकणकड्याच ते मनमोहक कातळ, तारामतीच पठार ,
महादेवाला प्रदक्षिणेसाठी बर्फासमान पाण्यामधे घेतलेली बुडी ती ही हरिश्चन्द्रावर। 
रतनगडाची शिडी, कलावंतीणचा आणि प्रबळगड़ावरचा म्हातारीचा किस्सा, गोरखगडावरची गुहा, वासोट्याच जंगल, पदरगडावरच चिमणी क्लाइंब, नागफणी,कोराई ,लोहगड ,विसापूर ,राजगड ,रायगड असे चिक्कार गड़ झाले,प्रत्येकाच नाव लिहित नाही पण प्रत्येकाचे सौंदर्य ते वेगळे आणि सह्याद्री मधल्या प्रत्येकाच्या आठवणी त्या वेगळ्या .
PathFinders at Pathfinders Birth Place HarishChandragad - Nikhil,Subodh,Dinesh,Varun,Abhiraj ( aani baaki mandali missing)
           गेल्या २ आठवड्यात २ ट्रेक झाले पहिला हरिशचंद्र आणि दूसरा सांधण व्हॅली दोन्ही ट्रेक ला जाम मज्जा आली हरिश्चंद्राला चौथ्या वेळेस गेलो पहिली वेळ आठवत नाही दूसरी २००७ ,तिसरी २००९ आणि चौथी २०१६, आता म्हणजे काय गडाच पार बाजारीकरण झालय. हॉटेल्स,दुकाने खुप गर्दी गर्दी झालीये, पण पहिल्यासारख राहिलय ते अमृतेश्वराच मंदिर व तिथले पाणी, वरची गुहा, महादेवाच्या पिंडी बाजुच बर्फासमान पाणी आणि कोकणकड़ा, गेल्या ब्लॉग मधे हरिश्चन्द्राच वर्णन केलेच आहे तर आता काही हरिश्चन्द्राबद्दल जास्त बोलत नाही.    

सांधण व्हॅली   !!!

         सांधण व्हॅली हा ट्रेक एक आतापर्यंतचा आलेल्या चांगल्या अणि आठवणीत राहिल अनुभवांमधे मोडतो.
सांधण व्हॅली हा ट्रेक भंडारदरयाजवळ साम्रद गावातून चालू होतो. पूर्ण ट्रेक हा ५ ते ७ तासांचा आहे. यामधे  रॅपलिंगचे ३ छोटे टप्पे, १ मोठा टप्पा आणि अधेमधे कमरेपेक्षा वर असलेल्या पाण्यामधून ओलांडून जावे लागते. या ट्रेक नंतर तुमच्या कड़े खुप जणांना सांगता येईल असे भारी किस्से/अनुभव असतात. आयुष्यात एकदा तरी सांधण व्हॅली ला जाउन या असा मी म्हणेन.
        पहिल्यांदाच अश्या १९ जणाच्या ग्रुप सोबत ट्रेकींगला गेलो. पहिल्यांदा मी जास्त लोका आहेत म्हणून नाही असेच म्हणालो होतो पण नंतर विचार बदलला ( किंवा तो बदलायला भाग पाडला ) . आपल्या ग्रुप मधे एकदम छान राहाता येत दूसरी कड़े असे वागता येत नाही दूसरे लोक चांगले असतीलच असे नाही, असे काही समज -गैरसमज दूर झाले, एकंदरीत सगळे ट्रेकर हे सारखेच असतात खिलाडू वृत्तीचे ( म्हणजे सगळेच असे नाही पण इथे मला जे भेटले ते तरी होते :P ).
      शुक्रवारी मुंबई ची गाड़ी पकडली तिथुन घाटकोपरला गेलो . तिथे आदित्य अणि मंदार अश्या राधेयच्या मित्रांनी आमच ( मी आणि सुरभि ) स्वागत केला सोबत जेवलो थोडावेळ इकडे तिकडे टाइमपास केला आणि रात्रि १२.५० ला कसारा ला जाणारी ट्रेन पकडायची आहे असे लक्षात ठेवून बरोबर रात्रि १२.४५ ला घाटकोपर ला पोहोचलो . पुढे १० मिनिटातच ट्रेन आली आणि आम्ही बसलो गाडीत जागा आहे असे पाहून फार आनंद झाला कारण मुंबई मधे ट्रेन/लोकल मधे बसायला अथवा झोपायला जागा मिळणे म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखेच आहे एवढी ती गर्दी असते तिकडे , डोंबिवली मधून काही , ठाणे मधून राधे आणि काही अर्धे लोक असे सगळे एकत्र जमणार होते . आम्ही बसल्या बसल्या ग्रुपवर मेसेज टाकून दिला "सगळ्यांनी पाचवा डब्बा पकड़ा !!" विशेष म्हणजे सगळे एकत्र एका डब्यात जमले . पहिल्यांदा कोणाची ओळख नसल्याने आम्ही आपआपल्या मधेच गप्पा मारत बसलो होतो . मुंबई मधे बसलो तेव्हा काहीच थंडी वाजली नाही , हाफ पँट आणि हाफ शर्ट घालून बसलो होतो पण जस जस कसारयाच्या दिशेने गेलो तशी तशी थंडी वाजु लागली एक वेळ अशी आली आहे त्या कपड्यावरूनच फुल पँट आणि स्वेट शर्ट वर आणि मफलर चढवला,

Punyatali Madnali, Aditya,Sudhir,Pradip ,Sneha, Surbhi, Radhey.
मग कसारयाला साधारण पहाटे ३.३० ते ४.०० च्या दरम्यान पोहोचलो,प्रचंड थंडी होती तिथेच आमचे लीड स्वनिल ने जीप ची सोय केलेली होती. १९ जणांसाठी दोन जीप ठरलेल्या होत्या मग आमच्या जीप मधे मागे मी , राधेय , आदित्य ,सुरभि आणि मधे स्नेहा , निकिता , स्रीपर्णा , विरजा आणि सगळ्यात पुढे नादखुळे ट्रेक रेंजर्स चे मालक :D स्वप्निल आणि अमिषा , बाकी सगळे उरलेले लोक दुसऱ्या गाडीत , थोडेसे पुढे  गेल्यावर परत थांबलो ,चहा,कॉफ़ी झाली आणि मग साम्रद गावात जायला गणपती बाप्पा मोरया करून निघालो. रस्त्यात जीपच्या मागे राधेय कड़े स्पीकर होता त्यावर मस्त जूनी ऐकली तीच आम्ही इतक्या मोठ्याने म्हणत कदाचित पुढच्या कोणाला झोपच लागली नसेल शेवटच " घेई छंद मकरंद " गाण्याने तर पार गावातल्या लोकांची पण झोप उडाली असेल. पहाटे ५ ते ५-३० च्या दरम्यान साम्रद या गावात पोहोचलो येथूनच हा ट्रेक चालू होणार होता , उतरल्यावर समोर कळसूबाई ,रतनगड़ ,आजोबागड़ , अलंग मदन कुलंग, असे काही छान गड़ दिसत होते . मग काही लोक सूर्योदय पहात बाहेर तर काही जण तिथेच एका घरी गेल्या गेल्या काही लोक उताणे पडले , सूर्योदय झाल्यानंतर समोरच्या सह्याद्रीच्या रांगेवर पडलेला सूर्यप्रकाश अप्रतिम दिसत होता,



नंतर प्रकाश नावाच्या गावकऱ्या कड़े नाश्ता करायचा आहे असे कळले आणि त्यानंतर ८ - ९ च्या दरम्यान निघणे अपेक्षित होते , नाश्त्याला जेव्हा पोहोचलो समोर पाहतो तर काय एक ४० आणि ३० लोकांचा ग्रुप आधीच तिकडे आलेला आहे , तेव्हा मला तर जत्रेचा अनुभव आला, काही वेळाने त्यांचे ते पुढे गेले आणि मग थोड़े बरे वाटले. तो पर्यन्त प्रातःविधि आटोपून सगळे आपले नाश्त्याला तयार !!!  मग नाश्ता झाला आवरून झाल आणि सगळे निघायच्या बेतात येऊन बाहेर थांबले आमचे लीड असलेले स्वप्निल यांनी सगळ्यांचे परिचय करून घेतला सगळ्यांची नावे कळाली, त्यातले एकच नाव मला खुपच वेगळा वाटल ते होता शूर्पकर्णखा उर्फ कोलकाता . बऱ्याच वेळाने नंतर मला कळाल की ते शूर्पकर्णखा नसून स्रीपर्णा आहे , पण तोपर्यंत उशिर झाला होता कारण आता डोक्यात फिट झाल होता - शूर्पकर्णखा फ्रॉम कोलकाता !!!

Nadkhule Trek Rangers Mandali.(me nahiye photot :( )
           Trekkers sathichi Swagat Kaman !!!


तेव्हाच आमच्या लीड ने सांगितले वाटेत जाताना कमरेच्या थोड़ा वर पर्यन्त पाणी आहे तर बूट ओले करायचे नसतील तर पायात चप्पल घालून घ्या . सगळ्यांनी आपापल्या सोयीनुसार पायताण चढ़वल आणि निघाले . थोडेच पुढे चालून गेल्यावर दोन झाडांची कमान दिसली , तिथेच आमचा खरा ट्रेक चालू झाला.
थोडेच पुढे गेल्यावर थोड़ा कोरडा पडलेला ओढा लागला , मस्त दोन्ही बाजूला सावली थोडस जंगला सारख आम्ही मोठ्या घळी मधून चालत होतो. मोठ मोठाले दगड दरड़ कोसळल्या सारखे वाटेत आडवे-तिड़वे पडले होते. त्यांना चुकवत आम्ही आपला पुढे सरकत होतो.



थोड्यावेळाने दिसले ते पाणी जे ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तारेवरची कसरत करत आमच्या लीड ने पाण्यात पाय न भिजवता पलीकडे कसे जावे याचे प्रात्याक्षित दिले, त्याला अनुसरुन काही जण मागुन गेले.
Radhey, Surabhi mage Avinash, Lalit




माझ्यासकट काही लोकांना एकदम पाण्यातली वाटच सोयीस्कर वाटली आणि आम्ही पाण्यातून गेलो , जाताजाता पाय घसरला पण पाण्यात पडलो नाही . पाण्याचा पहिला टप्पा जामच भारी वाटला. थोडेच पुढे गेल्यानंतर पाणी कमरेपेक्षा वर असलेला टप्पा दिसला तिथे जरा काही लोकांची तारांबळ उडाली, कारण पाणी ओलांडायच होता आणि सॅक पण भिजवायची नव्हती आणि पाणी अगदी थंड होता .
Kamrevar Panyacha pahila tappa sagale
saman suman pack kartana.
















सगळ्यांनी आपआपले सामान सॅक मधे भरल एकामागोमाग एक उतरले सॅक डोक्यावर घेऊन स्वप्निल , मी , अमीषा , राधे , आदित्य ,सुरभि असे सगळे निघालो. अधिच ठरला होता की सरळ रेषेत उभे राहून सॅक पास करायच्या, माझी सॅक जड़ असल्याने कोणाला द्यायच्या भानगडित पडलो नाही पण एका टोका पासून दुसऱ्या टोकाकडे डोक्यावरून सॅक घेऊन जाताना माझी बऱ्यापैकी दमछाक झाली होती. मग अर्ध्या पर्यन्त परत मागे येऊन बाकीच्या लोकांच्या सॅक आम्ही दुसऱ्या जागेवर पोस्त केल्या. आता आमची स्थिति अर्धवट भिजलेली होती , खरी मजा शेवटी होती जेव्हा मी शेवटची सॅक दिली त्यानंतर परत लोकांना तिथेच थांबायला सांगितले मधोमध गेल्या गेल्या कोणी कस अर्ध भिजलेल कस असू शकत असे म्हणून बऱ्यापैकी लोकांना भिजवल . झाल ज्यांना मी भिजवलेल त्यांनी एकत्रित येऊन मला भिजवुन बदला घेतला , आता मात्र सगळेच पेटले मग सगळेच एकमेकांना भिजवत यथेच्छ भिजलो. १०.३० पर्यन्त सगळे याबाजूला आले,
Panyatali Masti.
बाहेर आल्यानंतर बऱ्यापैकी थंडी वाजत होती. पुढे गेल्यानंतर ऊन लागल, इथे रस्त्यामधे उतरताना शूर्पकर्णखा उर्फ कोलकाता १-२ वेळा पडली , तीच पड़ण म्हणजे घसरून धप्प करून खाली बुडावर बसणे , येताना मी बऱ्यापैकी गुर-ढोर जशी हकताना ओरडतात तसा मी ओरडत होतो. अधेमधे आणखी एक दोघानी पण साष्टांग नमस्कार घातला पण कोलकाता एवढा बोलबाला कोणाचा झाला नाही ,कारण नंतर नंतर कोण पड़ल याच एकमेव उत्तर हे कोलकाता असायच.स्नेहा ने पण एवढे सगळे पड़त आहेत मग मीच का पडू नये असे म्हणून पडून घेतले.  या व्हॅली मधे छान इको येत होता थोड़ा पुढे गेलो आणि काढली बासरी , बसलो वाजवत.  बरोब्बर १ वाजता आम्हाला पहिला रॅपलिंग चा टप्पा लागला. आम्ही वाटेत एका आडोश्याला थांबलो मागच्या लोकांची वाट पाहत थोड्यावेळाने वरच्या लोकांपैकी कोणाचा तरी मोठ्याने हसायचा आवाज आला तो बहुतेक अजिंक्य असावा , मग इथून कोणीतरी म्हणाल हा हसतोय म्हणजे नक्कीच कोणीतरी पड़ल . काहीवेळाने मागची लोका आली आणि आम्ही निघालो रॅपलिंग करायला , पहिला कातळ टप्पा बहुतेक ५०-६० फुटांचा असावा स्वप्निल ,अमीषा ,आदित्य ,राधे ,सुरभि,सुधीर,स्नेहा,प्रदीप असे सगळे एकामागोमाग एक पुढे जाऊ लागलो तोपर्यंत मागची मंडळी आराम करतच होती ,

Pradip,Sneha,Sudhir.

Lalit,sandeep,viraja,swapnil,avinash,nikita

Swapnil,Swapnil,Radhey,Sandeep,Aditya,Pradip,Surabhi. 
 तिथल्या इंस्ट्रक्टरने हार्नेस आम्हाला लावला आणि पुढे जायला सांगितला , जेव्हा ती दोरी धरली पहिल खात्री करून घेतला वरुन सुटणार तर नाही ना मग हळू हळू एका हाताने दोरी सोडत सोडत नंतर खाली किती खोल राहिल आहे ते परत पहायची हिम्मत झाली नाही, वरचा तो इंस्ट्रक्टर काहीतरी म्हणत होता, त्याकडे लक्षही नव्हत केव्हा एकदा खाली जातोय असा झालेल सरतेशेवटी उजव्या हातावर जाम लोड आला होता पण उतरलो मज्जा आली . बाकी लोक पण एकेक करून उतरले


Amche lead Nadkhule Trekkers che Malak- Swapnil


Me Utartana :) !!

आता जेवायच काय हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता सगळ्यांना सडकून भूख लागलेली. आता इथे किस्सा असा झाला आमच्या साठी प्रकाशकडून जे जेवण मागवल होता ते दुसऱ्या ग्रुप च्या लोकांनी आम्ही पोहोचायच्या अधिच खाऊन टाकला हे आम्हाला जेव्हा कळला तेव्हा दुपारचे २.४५ झाले होते . तिथेच जेवण मिळणार नाही हे ऐकल्यावर कोलकाता एकदम ढासळलीच " हमें खाना नहीं मिलेगा? " " अभी और कितने दूर जाना है? " " रैपलिंग और भी है क्या? "
असे असंख्य प्रश्न तिच्या समोर दत्त म्हणून उभे राहिले आणि तिच्यामुळे आमच्यासमोरही !!!
जेवण नाही  म्हणून लोकांनी आपला चकली चिवड़ा असे चिरमिर खाऊ बाहेर काढले त्यावरच आम्ही समाधान मानून पुढे निघालो. तिला बाकी लोकानी विचारालाही हे खायच का? नाही म्हणाली , मग निघालो आम्ही.
कोलकाता शूर्पकर्णखा उर्फ़ स्रीपर्णा :P मागे सुधीर,स्नेहा,अमीषा,स्वप्निल,आणि मी. 
 छोटा रॅपलिंगचा टप्पा



 पुढे ती जामच वैतागली होती , शूज ओले होउ नये म्हणून पाणी आल की शूज काढ़ा थोड़े पुढे कोरडे आहे असे जाणवले की परत शूज घाला , थोड़े पुढे जातोय न जातोय तोवर पुन्हा पाणी  !!!! आता बऱ्याच लोकांच्या पायात वात भरत होता इकडे तिकडे   ....... आ..ऊ...... . ! चालूच होता खाऊन झाल आणि पुढे निघालो . दूसरा कातळ टप्पा ज्याच्या दुसऱ्या बाजूला एकदम पाणी  ज्याला पाण्यातून जाण्याशिवाय मार्गच नाही परत सॅक काढायचे सोपस्कार झाले आणि एकेक उतरून खाली आलो , पुढे गेलो तिथे एका फटीमधून आम्हाला जायचा होता. अगदी इवलीशी होती ती फट आणि तिथुन जाताना पाय खाली डोका वर असे उलटे जायचे होते पूर्ण गडद अंधार काही दिसेना.
एवढीशी फट - पुढची बाजू.  
तीच फट दुसऱ्या बाजूने.  
   दुसऱ्या बाजूंच्या फटीतून सगळ्यांच्या सॅक पुढे दिल्या आणि एकेक करून आम्ही उलटे होऊन खाली . इथे पुन्हा छोटा टप्पा होता रॅपलिंगचा !! लोकाना इथे येईस्तोवर रॅपलिंग ची सवयच झालेली होती इतक्या वेळ नाही नाही करणारे काही लोक आनंदात पुढे जात होते. सगळे खाली आले जरा वेळ बसलो परत कोलकाताचा प्रश्न " अभी और कितने दूर जाना है? रैपलिंग ख़तम ना ? " तिला रॅपलिंग सगळ संपला आहे आणि आता आपण पोहोचणारच आहोत असे सांगून निघालो,

मी,विराजा,सुरभि,राधेय,आदित्य स्वप्निल,अमीषा 











थोडेच पुढे गेलो आणि विरजा म्हणाली। ...    सरप्राइझ !!! समोर पाहतोय ते काय पुन्हा एकदा रॅपलिंग तेव्हा एवढेच शब्द बाहेर आले " अरे याररर र र !!! "
तो खरच शेवटचा आहे असे सांगून उतरलो , इथे मुलींसाठी वेगळा रोप आणि मुलांसाठी वेगळा रोप असा भेदभाव केला होता.  मुलांचा जो रोप होता तो पाण्यातुन जाणारा होता ( वॉटरफॉल रॅपलिंग  ) आणि त्याला काही हार्नेस वैगेरे प्रकार नाही कमरेला दोरी बांधणार आणि सुटायचा खाली पाण्यातून , मुलींची सोय चांगली होती मस्त ग्लोव्ज , आणि हेल्मेट हार्नेस वगैरे, वगैरे पण त्यांच्या वाट्याला पाणी नव्हत कोरड्या जागेतून त्यांना रॅपलिंग करायची मुभा , मग सगळ्या पोरी गेल्यानंतर २-३ हार्नेस बाकी होते त्या इंस्ट्रक्टरने विचारले कोणाला जायचे आहे का इथून आम्ही लगेच एका पायावर तयार ,मी आदित्य आणि अजुन एक दोघे तिकडून गेलो आणि बाकी मंडळी भिजत भिजत उतरले. या सगळ्या गडबडीत राधे ची बॅग पाण्यात पडली , ३-४ मिनट पाण्यातच आणि नशीब राधे थोड़ा बाजूला उभा होता नाहीतर काही खर नव्हत .पटकन त्याने ती बाहेर काढली आणि मोकळी केली आत मधे सगळ प्लास्टिक बॅग मधे गुंडाळून ठेवला होता त्यामुळे त्याची रात्री झोपायची पंचाईत झाली नाही.संध्याकाळी बरोबर ६.०० वाजता शेवटचा कातळ टप्पा उतरून आम्ही पुढे निघालो.

रॅपलिंग चा शेवटचा टप्पा उजव्या बाजूला पाण्यामधून डाव्या बाजूने कोरडया जागेतून !!!
 तिथुन तंबू पर्यन्तच अंतर जास्त नव्हत. अंधार पडत चालला होता मग आम्ही टॉर्च बाहेर काढल्या इथून तंबू पर्यन्त जाईपर्यंत कोलकाता उर्फ शूर्पकर्णखा चा घसरणे वजा पड़ने असा २-३ वेळा कार्यक्रम झाला. तंबू ठोकलेल्या जागेवर पुढच्या अर्ध्या - पाउण तासात पोहोचलो ,सगळे निवांत पहुडले होते समोरच गावतले जे आम्हाला जेवण करून देणार होते त्यांची तयारी चालू होती. ओढयाच्या बाजूलाच तंबू ठोकलेले होते.


गेल्या गेल्या पाहिला आयता चहा मिळाला दोन कप चहा मारुन आम्हीपण लोकांमधे पहुडलो , वर छान चांदण दिसत होता. असा पहिल्यांदाच झाल की ट्रेक आयता चहा मिळाला नाहीतर दरवेळेला आम्ही पोहोचलो की मग सगळे ते सोपस्कार चूल पेटवणे आणि मग दूध बनवा वगैरे वगैरे पण इथे स्वप्निल ने बऱ्यापैकी सोय करून ठेवली होती. अर्धे लोक तंबू मधे गेले अर्धे तिथेच पडून राहिले , रात्रि ८-९ दरम्यान सगळे जेवायला पुन्हा एकत्र आले , जेवण म्हणजे अगदी कोणालाही किंचितहि थंडी वाजु नये असेच बनवले होते अगदी झणझणीत , मस्त मसाले भात, आमटीवजा भाजी, पूरी, लोणच (आता या मधला नेमका तिखट काय होता हे नाही कळाल कारण सगळ तिखटच लागत होता ). काही लोकांना तिखट नाही लागला बहुदा सवय असावी पण ज्याना तिखट लागल त्यांनी साखर स्पेशल स्वीट डिश म्हणून मागवली.रात्रि कॅम्प फायर झाली गप्पा गोष्टी झाल्या.रात्रि परत कुठेतरी चालताना कोलकाता पडल्याचे ऐकले पण विशेष नाही.

                                                                   PC - Lalit
 दुसऱ्या दिवशी आमचे लीड स्वप्निल सादये याचा वाढदिवस होता. रात्रि केक आणि बाकी सजावट ही त्यांच्या टेंट मधे करून ठेवली ( स्वप्निल च्या नकळत ), मग रात्रि ११.३० चा गजर लाउन आम्ही झोपलो, दमलो असल्याने झोपही लगेच आली. रात्रि ठरल्याप्रमाणे गजर वाजला लोका उठले वाढदिवस साजरा झाला, आणि पुन्हा सगळे झोपुन गेले.

अवधूत,अविनाश,आदित्य,राधेय,अजिंक्य,स्वप्निल,स्वप्निल,ललित,सुरभि,अमीषा,विरजा,निकिता,प्रदीप,स्नेहा रूपेश,सुधीर 
सकाळी ७-८ दरम्यान जाग आली बऱ्यापैकी सगळी मंडळी आपापल्या तम्बू मधून बाहेर डोकावत होती. सगळ्यांची झोप सुखाची झाली असावी फ़क्त लोकांचे हातपाय बऱ्यापैकी ओरडत होते. मी जेव्हा उठालो माझा आवाजच फुटेना काल उगाच लोकांना चिडवल तेही ओरडून ओरडून लोकांनी मनापासून शिव्या दिल्या की माझा आवाजच बसला ( जस्ट किडिंग नथिंग सिरियस ) !!  सकाळी ९ वाजता मस्त पोह्यांच्या नाश्ता झाला चहा झाला,
नाश्ता पोहे !!!

 सगळ्यांनी सॅक आवरायला चालू केला. ज्यांच आवरून झालेल त्यांनी सगळ्यांचे  फोटो काढून घेतले सरतेशेवटी एक झक्कास ग्रुप फोटो झाला.

तिथुन आम्ही निघालो. सगळ आवरून निघेपर्यंत १०.४५ झाले, जामच ऊन पड़ल होता. तासभर चालल्या नंतर आम्ही सावलीच एकेठिकाणी थांबलो. इथे विविध गुणप्रदर्शन आणि आभारप्रदर्शन झाल , आभारप्रदर्शनात राधेय ने बनवलेले एक फूलवजा पुष्पगुच्छ स्वप्निलला सर्वांतर्फे दिला , विविध गुणप्रदर्शनात त्यामधे आमिषाने बऱ्याच पक्षांचे आवाज, काही मिमिक्री करून दाखवल्या त्यातली कोकिळातर अगदी हुबेहुब होती . प्रदीप ने राजकुमार ची मिमिक्री केलि आणि सरतेशेवटी लाजाळू बाबु उर्फ अवधूत ने खुप विनवण्या केल्यानंतर " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" हे गाणे गाउन दाखवले,

पुष्प नसलेला गुच्छ प्रदान सोहळा !!!!
सगळ झाल्यावर निघालो भरपूर ऊन खात जेवण करायच्या जागेचा पत्ता शोधत आम्ही आपला चालत होतो मधे एक वेळ अशी आली की रस्ता चुकलो की काय असे वाटले, पुढची मंडळी खुपच पुढे आणि मागची मंडळी खुपच मागे असा काहीसा प्रकार झाला होता. राधेय , आदित्य आवाज देत होते,उतरताना माझा आवाजाचा ओरडून जवळ जवळ गेलाच होता त्यामुळे मी काही ओरडायचा प्रयत्न केला नाही , आम्हाला २ सेकंद साठी वाटलासुद्धा हरवलो म्हणून पण जरा थांबलो मागचे लोक येई पर्यन्त. ( मनात असा की मागचे सोबत जर आले तर हरवलेल्या लोकांची संख्या वाढेल आणि जास्त टेंशन येणार नाही ) मग जरा वेळ मागचे येई पर्यन्त थांबलो २० मिनिटने मागची मंडळी दिसली आणि आम्ही तसेच पुढे निघालो. वाटेत एका जवळ जवळ कोरडा झालेल्या ओढ्या जवळ थांबलो सगळ्यांना तहान लागलेली होती सगळ्यांच्या जवळचे पाणी संपल्यात जमा होते.
दुपारच्या एका निवांत क्षणी सावलीत.... 

स्वप्निल सांगत होता की पुढे तुम्हाला पाणी मिळेल थोडेच पुढे तिथे बोरवेल आहे... पोर आपली पुढे बोरवेल च्या आशेने चालत होती पण तो बोरवेल काही दिसत नव्हता. दुपारचे २ वाजले तरी बोरवेल चा पत्ता नाही , बहुदा रस्ता चुकला असावा.
दुपारचे कोवळे कड़क ऊन खात जाताना  !

थोड्याच वेळात ते गाव लागल बोरवेलही लागल पण जे बोरवेल हवा होता ते नाहीं लागल कारण आमच जेवणाची सोय ही एका बोरवेल समोरच्या घरात झालेली होती आणि तो बोरवेल आम्हाला किंवा स्वप्निलला मिळत नव्हता. पण जिथे आलो त्या घरात छान थंड पाणी प्यायलो आणि २ मिनटे सावलीत बसून तिथल्या आज्जीना चॉकलेट्स आणि बिस्किटे दिली धन्यवाद म्हणालो आणि निघालो तिथेच कळाल आम्ही जे घर शोधतोय ते थोडेच पुढे आहे. देहणे गावातल्या त्या पाट्करांच्या घरात एकदाचे पोहोचलो आणि जे सॅक बाजूला टाकून पडलो ते जेवण तयार होई पर्यन्त हललोच नाही. फोटो पण काढायला कोणी उठत नव्हत मग विरजा ने कोलकाता उर्फ शूर्पकर्णखा ला बाजूला बसायला ये असा आवाज दिला आणि ती येताच तिच्या हातात कॅमेरा देत फोटो काढायला सांगितल, ती जवळ जवळ वैतागलीच पण तरीही तिने काढले ३-४ चांगले फोटो. जेवण तयार होई पर्यन्त अर्धे लोक गप्पा मारत होते आणि उरलेले अर्धमेल्या सारखे पडलो होतो. जेवण तयार आहे असा कळलं आणि आम्ही थेट घरात......
दुपारच्या उन्हात दमलेली, तहानलेली ,भुकेलेली मुले.  
 जामच भूक लागलेली होती. ४ जण शाकाहारी आणि बाकी चिकन हाणणारे छान बसलो आणि समोर जेवणाच ताट वाढायला सुरुवात झाली. वाळवलेल्या कैरीची आमटी , भाजी ,भाकरी ,लोणच,पापड़ ,भात , वरण असा सागरसंगीत जेवण आमच्या नशिबी होता. आख्या ट्रेक मधले ते शेवटच जेवण म्हणजे एखाद्या आईसस्क्रीमच्या शेवटच्या घासाला छानशी चेरी येणे असा इतका छान होता.

मस्त जेवण !!!
 जेवण झाल आणि जीप ची वाट पहात पुन्हा आम्ही वरांड्यात पहुडलो. काही जण गावातल्या ३ लहान मुलांसोबत नावाच्या भेंड्या खेळत बसले , ती लहान पोर पण जाम हुशार होती. त्यांच्या मधे २ पोर आणि १ पोरगी होती, त्यांनी जवळ जवळ गावातल्या सगळ्या लोकांची,मित्रांची,हीरो,हिरोइन यांची नावे सांगितली. पार WWE मधल्या JOHN CENA पर्यन्त नावाच्या भेंड्या जाऊन आल्या. काही वेळाने ठरवलेल्या २ जीप आल्या परत सॅक वगैरे गाडीत टाकल्या. गाडीत परत मोठ्या आवाजात गाणी पण माझ्या घश्याची बोम्ब झाल्याने अजूनही माझा आवाज काही फूटत नव्हता. तिथुन जीप ने आम्हाला आसनगाव स्थानका पर्यन्त सोडले आणि तिथुन आम्ही निघालो ते ठाण्यात उतरून आम्हाला कुठलीशी ती ७. १० ची हुबळी एक्सप्रेस मिळाली, तिथुन एकदम पुणे रात्रि बरोबर ११:३० वाजता मी घरी पोहोचलो.
           एकंदरीत खुप मज्जा आली या ट्रेक ला बरेच लोक नविन होते, चांगल म्हणजे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही सगळे जसे धडधाकट आले होते तसेच परत गेले. खरचटणे, दुखणे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टि अश्या होतच असतात, बऱ्याच नविन छान ओळखी झाल्या, तुम्हा सगळ्यांना खुप खुप धन्यवाद !!!!

लोकल च्या अर्ध्या डब्ब्यावर आमचा कब्ज़ा !!!



सदस्य -
१. सुरभि
२. अमीषा
३. स्रीपर्णा ( कोलकाता शूर्पकर्णखा :P )
४. स्वप्निल ( आमचा लीड )
५. राधेय
६. आदित्य
७. विरजा
८. ललित
९. निकिता
१०.सुधीर
११. संदीप
१२. अजिंक्य
१३. अवधूत
१४. प्रदीप
१५. स्नेहा
१६. स्वप्निल
१७. अविनाश
१८. रूपेश
१९. निखिल 

Tuesday 5 July 2016

अभिराज कचरे सरांच (आण्णाच ) फेअरवेल .. !!!

दिनांक ५-७-२०१६
          अभिराज कचरे  सरांच (आण्णाच ) फेअरवेल .. !!!  अभिराजच आण्णा हे टोपणनाव ( फ़क्त मित्रांमधे !! आणि त्याच्या विद्यार्थ्यांना आज ते कळलय त्यामुळे आता मला इथे लिहायला काहीच हरकत नाहीं. ) अभिराज कचरे हा माझा मित्र आणि  PCCOE या इंजीनियरिंग कॉलेज मधे एका वर्गाचा क्लासटीचर आहे म्हणजे तो होता आजपर्यंत ।
    संध्याकाळची ६.१५ - ६.३० ची वेळ ऑफिस सुटल आणि आता निघणार तेवढ्यात मयूरचा  (अभिराज सरांचा विद्यार्थी ) मला फ़ोन. अरे निखिल आज सरांच फेअरवेल आहे केक वर नाव काय लिहू ? आणि तुला जमेल का यायला ? सरांना सरप्राइज़ देऊ !!! ( माझी आणि याची ओळख एका अभिराज सोबतच्याच ट्रेकला झाली होती ) . मी म्हणालो ठीक आहे येतो , चला तेवढीच जरा आण्णाची खेचुया ६.३० - ६.४५ च्या दरम्यान पोचलो कॉलेज वर मग जरा जुन्या आठवणी ताज्या झाल्या माझ्या डिप्लोमा कॉलेज वर एक चक्कर मारली। आणि मग मयूर ,ओंकार केक घेऊन आले मला भेटले मग थेट आण्णाच्या क्लासरूम मधे गेलो , कचरेसर तिथे नव्हते ते बाकीच्या प्रोफेसर लोकांच्या फेअरवेल मधे अडकले होते , क्लासरूम मधे आधीच पोरांची तयारी चालु होती कोण कोण काय काय करणार , सरांना भारी कसे वाटेल आणि आपण काय काय करुयात वगैरे वगैरे , माझी ओळख मयूर ने सगळ्यांशी करून दिली आणि मीही त्या मुलांमधलाच एक विद्यार्थी झालो. आधीच पोरांनी बॉर्डवर बरच काही लिहुन ठेवला होता मग मिहि त्यामधे काही गोष्टी भरल्या सुबोधला फ़ोन केला त्याने एक वाक्य सांगितला ( सुबोध जोशी PCCOE मधलाच अभिराज सोबतचा अतिशय हुशार विद्यार्थी की जो आत्ता IIT मुंबई ला पीएचडी करत आहे )  अशी  ४-५ वाक्य फळ्यावर लिहिली की जी फ़क्त आण्णा आणि त्याच्या मित्रांनाच माहित होती. आता तो बोर्ड पूर्णपणे भरला होता ,

         मग मी मुलाना सुचवल की सरांची वर्गात एन्ट्री झाली की " शक्तिमान " सिरिअल च गाणे म्हणायचे, तसा ठरलहि , थोड्या वेळाने सर येत आहेत असे सांगत एक विद्यार्थी आला,सगळ्यांनी दिवे बंद केले आणि वाट पाहू लागले मि काही पोरांमागे लपून बसलो. १० मिनट झाले तो काही आला नाही परत कोणीतरी म्हणाल सर आले सर आले पुन्हा तसच तो आला नाही , क्लासरूम मधे येताना बरेच सरलोक त्याला भेटत होते त्यामुळे सगळ्यांशी बोलत बोलत त्याला यायला वेळ होत होता. थोड्या वेळाने शेवटी त्यांची एन्ट्री झालीच वर्गात , सगळे चालु " शक्ति शक्ति शक्तिमान!!!शक्ति शक्ति शक्तिमान!!! शक्ति शक्ति शक्तिमान !!! "  आणखी काही त्यांची ठरलेली वाक्य म्हणून झाल्यावर सगळी पोर ओरडायला लागली "सर जाऊ नकाना " , " फ़क्त तुमच्याच लेक्चर ला मज्ज्या येते तुम्ही खुप भारी शिकवता " "आणि तुम्ही गेल्यावर आम्हाच्या Friday Story च काय ?" वगैरे वगैरे नुसता किलकिलाट चालू होता , मग सरांनी सगळ्यांना शांत केला समजावले आणि सगळे शांत झाल्यावर दिवे लावले आणि बोर्ड वाचू लागले ,
भरलेला बोर्ड !!! 

हे कोणी सांगितला तुम्हाला ? ते कोणी सांगितला ? निखिल्या ने सांगितला का ? मला मनातल्या मनात शिव्या घालत विचारत !!!!!!   ... .......  पोरा आपली म्हणत आहेत हसत हसत आम्हाला नाही माहित कोणी लिहिलय ते कोण निखिल ?  , मग जे जे काही लिहिला होता त्याचा खुलासा करा असा मुलांचा आग्रह !!! मग त्या विषयी जे जे जसे जसे घडले होते ते मजेदार किस्से आण्णा ने मुलांना सांगितले आणि ते किस्से सांगताना पोर एकदम कान लाऊन ऐकत होते पोटधरून हसत होते  ,  मी आपला मागे लपून बसलो होतो मिहि आपला छान पणे हसत ऐकत होतो सर्व . एक दोन किस्से सांगताना मधूनच काही थोड़ा असा रोमांटिक मूड मधे पोर मागून  " Hmmmmmmm "  " Hmmmmmmm mmmmmmm  "  करायची आणि तो आपला लाजरा बोजरा व्हायचा आणि म्हणायचा अरे तुम्ही समझताय तसा काहीही नाहीये !!!! .......
सगळे किस्से संपल्यावर शेवटच्या किस्स्याला मी बाहेर आलो आणि मला पाहिल्यावर दोन  चार शिव्या देऊन "साल्या तू आहेस काय इकडे मला वाटलच तुझ्या शिवाय हे कोण सांगणार यांना "
मग थोड्याफार गप्पा मीही मारल्या मुलांसोबत मज्जा आली, त्याना सगळ्यांनाच असा वाटत होत की सरानी सोडू नये म्हणून।  मग काही मुलांनी आणि सरांसोबत आलेले छान अनुभव सगळ्यांना सांगितले काही जणांनी ट्रेक चे अनुभव तर काहींनी कॉलेज मधले अनुभव सांगितले ते सांगताना अभिराजला पण खुप भारी वाटत होत. सरतेशेवटी मुलांनी आणलेला केक सरांनी कापला आणि शेवटी मुलांना एक आण्णा ने छान शिकवण दिली त्याला जो अनुभव आला होता त्यामधून , मलाही ते फार आवडल. तो म्हणाला "आयुष्यात खुप असे कठीण प्रसंग येतात की त्यामधे देव तुम्हाला खुप कठोर पणे तपासतो , तुम्हाला आजमावतो , तुमच्यामधे कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची  किती क्षमता आहे ते तो तपासतो , त्या परिस्थितीतही तुम्ही खंबीर पणे उभे रहा , आलेल्या प्रसंगाला सामोरे जा तुम्ही निश्चितपणे जिंकाल ! " 
       पोरे एकदम खुश नुसत्या टाळ्या आणि टाळ्या !!!!
धन्यवाद !!! आपण सगळे पुढच्या एका ट्रेकला नक्की भेटू !!! असे म्हणून आम्ही दोघांनी सगळ्या मुलांचा निरोप घेतला आणि निघालो।

सर आणि केक !!
 सरांचे विद्यार्थी !
सर आणि विद्यार्थ्यांसोबत मी 





पोरांनी केलेला कल्ला !!!







         

Friday 15 April 2016

Maitri !!!

मैत्री !!
जिवलग मित्रांबद्दल काहीसे लिहावेसे वाटले म्हणून लिहितोय ...मैत्री म्हणजे काय माझ्या एक मैत्रिणीने फारच छान लिहिले आहे ....सर्वात पाहिले कारण म्हणजे आपल्याला त्याची सोबत आवडते, सोबत म्हणजे नुसते एकत्र असणे ,एकत्र फिरणे, असे नाहीं तर गप्पा सुद्धा यामधे येतात. आपल्याला आलेले भलेभुरे अनुभव, एखाद्या घटने बद्दलचे आपले मत,प्रतिक्रिया, आपल्याला मिळलेल यश किंवा अपयश हे सगळच आपल्याला कोणाला तरी सांगावेसे वाटते, आणि आपले ऐकणारा श्रोता, आणि त्यावर प्रतिक्रिया देणारा, आपल्याला सल्ले देणारा एक मार्गदर्शक आपल्याला नक्कीच हवा असतो,अशी एखादी व्यक्ति आपल्या आयुष्यात आली त्या दोन जीवांचे एक मैत्र तयार होते ( इथे माझे  जवळ जवळ २०-२५ जिव तर नक्कीच आहेत ज्यामुळे आमच मैत्र तयार झालय ) मग त्या नात्याला संवादाची पण गरज रहात नाहीं, थेट देहबोलीतुन आवाजावरुन एकमेकांच्या भावना पोचल्या जातात , त्यावरच्या प्रतिक्रिया आपसूकच घडतात त्यातूनच मैत्रीचे सुन्दर नाते फुलत जाते.आणि हे सगळे एकाच वाक्यात सांगायचे झाले तर "प्लीज़ मला एकटे सोड " असे निक्षून सांगितले तरी जो हात सोडत नाही आणि आणखीनच घट्ट धरून ठेवतो तोच खरा मित्र.          
       आज पर्यन्त अनेक जण भेटले शाळेपासून कॉलेज पर्यन्त आणि कंपनी मधे सुद्धा !! पण बरेच जण आले काही दिवस , काही वर्ष सोबत राहिले आणि नंतर निघूनही गेले. शाळेमधले जिवलग अजूनही सोबत आहेतच ति म्हणजे आमची ट्रेकिंग ची मंडळी , पण शाळेनंतर आणि कॉलेजच्या सुरु असताना जे माझ्या कॉलेजमधेही नव्हते असे काही दोस्त मला भेटले काही ट्रेकिंग मुळे आणि काही कम्प्यूटर गेम्स मुळे , ते अजूनही सोबत आहेत आणि पुढेही राहतीलच . डिप्लोमाला असताना मला कम्प्यूटर गेम्स खेळायच खुप वेड होता. सायबर कैफ़े मधे जाऊन मी गेम्स खेळायचो , तिथेच काही लोकांची ओळख झाली आणि ती एवढी दॄढ़ झाली की बस !! ते सगळे माझ्या पेक्षा मोठे कोणी इंजीनियरिंग ला तर कोणी बीसीएस असे सगळे वेगवेगळे पण तरीही गेम्स खेळायला सगळे एकत्र त्यावेळी माझ्या कड़े मोबाइल नव्हता घरी लँडलाइन होता आणि सायबर कैफ़े बाहेर कॉइन बॉक्स !!! सगळ्यांचे मोबाइल नंबर पाठ , सगळे आपले एक फ़ोन वर हजर ( कॉलेज बंक करून ) काही वेळेस दिवसभर कॉलेज च्या नावाखाली गेम्स खेळलो आहोत. १०-१२ वर्ष तर नक्कीच झाली असतील....... विनय,आशिष,गणेश,तुषार,सुशांत,सागर, तेव्हा भेटले ते आजही सोबत आहेत , आजही अधे मधे साइबर मधे जाऊन खेळायची हुक्की आली की सगळे परत जूने दिवस आठवत आम्ही सर्व मनसोक्त खेळून येतो  . डिप्लोमा झाला ,डिग्री झाली हे वेड कमी झाल तोवर क्रिकेट चालू झाल मग काय दर शनिवार , रविवार क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आणि क्रिकेट झाल्यावर मिसळ, मिसळ खायला तर सगळी मुले पार नारायणगाव पर्यन्त जाऊन येतात, आमच्याकड़े बरेच चांगले खेळणारे खेळाडू आहेत आशिष, विनय (आमचा कॅप्टन :) ), सुशांत, तुषार, सागर, नीलेश, गणेश, प्रणव, अमित, हर्षद, निखिल, अक्षय, ज्ञानेश्वर, अभिषेक, प्रतिक आणखी बरेच असेच खेळायला येत असतात ( तस मला जास्त चांगल खेळता येत नाही पण तरीही मला मज्जा येते ) . खेळताना सगळे इतके aggressive असतात की बाप रे !!! त्यातल्या त्यात आशिष, विनय तर कोणालाच ऎकत नाहीत, हल्लीच आम्ही एक Tournament जिंकलो जाम धम्माल केली आम्ही तेव्हा.


       दर वर्षी कोकणात दापोली, गणपती पुळे , हर्णे, असे फिरायला आम्ही जातच असतो, आधी बाइक वर जायचो आता सगळ्यांकडे चारचाकी आल्याने चारचाकी ने जातो, तिथे खुप गप्पा होतात, प्रत्येकाच्या मनातल बाहेर येत. बीच क्रिकेट ,फुटबॉल , कबड्डी असे अनेक खेळ खेळतो जामच मज्ज्या येते.




                     

आमच्या मधे ३-४ जणांची लग्न झालेली आहे , बरयाच घरगुती कार्यक्रमात सगळे हजर असतात, दरवर्षी सणासुदीला सगळे एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात, घरच्या लोकांना पण आमची मैत्री पाहून फार आनंद होतो. असा एकही लग्न/साखरपुडा झालेला नाही की त्या लग्ना मधे सर्व मित्रांची तारीफ़ झालेली नाही , प्रत्येक लग्ना मधे आम्ही हे ऐकला आहे की तुम्ही सगळे मित्र होतात म्हणून हे सगळ छान पार पड़ल, आणि हे ऐकल की आम्हाला सर्वाना खुप भारी वाटत. आमच्या मधे प्रत्येकाचे
एक वेगळे स्थान आहे, सगळ्यांचे स्वभाव वेगळे आहेत, पण सूख असो दुःख असो सगळे हातातले काम सोडून अडचणी मधून मार्ग काढून हजर असतात, कितीही अटीतटीची भांडणे झाली कितीही विकोपाला गेली तरी.......  तरीही पाहिले सॉरी कोण म्हणेल या मधे चढाओढ असते आणि मला वाटत यालाच मैत्री म्हणतात.


          माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधेहि असेच काही जे माझ्या शाळेत नसलेले फ़क्त ट्रेकिंग मुळे मला भेटलेले असे छान दोस्त मला मिळाले, खरतर माझ्या काकालोकांचा ट्रेकिंगचा जूना ग्रुप २५-३० वर्ष झाली असतील ते सर्वे ट्रेक करत असल्यामुळे ते नेहमीच ट्रेकला जात असायचे, मी तिकडे कधी पासून जाऊ लागलो मला आठवतही नाही, माझ्या शब्दात मी म्हणेन "गडकोट किल्ले हे तर आपले जणू दूसर घरच, फारच प्रेम आहे माझे ऊंच ऊंच कड्यांवर , कोसळणारया धो धो पावसावर, सोसाट्याच्या वारयावर आणि त्यामधे हे सगळे मित्र सोबत असतील तर क्या बात !!!! " मग सवय लागली मित्रांसोबत जायची मग ग्रुप तयार झाला, सगळे सोबत जाऊ लागलो. खुप मज्जा येते जेव्हा गडावर आम्ही सर्व लोक एकत्र बसलेलो असतो, कुणाचाही त्रास नाही फ़क्त आणि फ़क्त असतात त्या आमच्या गप्पा , तो समोरचा गड , आजुबाजुच घनदाट जंगल आणि समोरच वाहता ओढ़ा !!!!
 

 



       माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधे दोघांची लग्न झालेली आहेत आणि एक-दोघे लग्नाच्या वाटेवर आहे नचिकेत, सायली, सुबोध , नेहा, वरुण, उमा, अभिराज, अमेय, अमित, दिनेश, श्रीधर,दर्शन ,कौशिक,निखिल,हर्षद आणि अधेमधे आणखीही काही लोक ट्रेकला येत असतात, काही वर्षापुर्वी आम्ही इतके ट्रेक ल जायचो की बस्स !! काही काही ट्रेकला तर मी आईला सांगायचो " आई आलोच जाऊन आणि चक्क गडाजवळ आलो की सांगायचो " मी एका जवळच्या गडावर आलोय येतो संध्याकाळ पर्यन्त " मग घरी आल्यावर जामच तम्बी मिळायची, एका आठवड्यामागून एक अश्या पुढच्या ट्रेक ला जाताना आईला विचारल की आई मला म्हणायची " अजिबात कुठेही जायच नाही, सारख सारख काय ठेवलाय गडावर आणि जायचच असेल तर आता गडावरच जाऊन रहा काही यायची गरज नहीं आहे घरी ! " मग सगळी मुला आईला सांगायला घरी "काकू जाऊदयाना,सोडाना त्याला परत नाही जाणार आम्ही त्या गडावर आणि पुढचे काही दिवस तर अजिबात कुठेच जाणार नाही घरीच थांबू ". काही वेळाने मुल घरी गेली की परत मला शिव्या बसयच्या "तूच म्होरक्या आहेस सगळ्यांचा सारख सारख तूच ठरवत असतोस हे सगळे। असे. ....... तसे. " रात्री परत मग लाडी गोडी लावून आम्ही सगळी पोरे दुसरया दिवशी गडावर !!!!!!
         

       आणखी असे बरेच खुप छान , चांगले दोस्त मी कमावले आहेत एम आय टी कॉलेज मधला ग्रुप , फिरोदिया करंडक मधले मित्र, माझ्या कंपनी मधले दोस्त, माफ़ी असावी कारण सगळ्यांचाच उल्लेख येथे करू शकलो नाही, पण जेवढे पण मित्र मला भेटले ते सर्वच चांगले मिळाले कोणीही माझे वाईट चिंतले नाही अथवा मी कोणाचे वाईट चिंतले नाही. व पु काळे यांची एक खुपच सुंदर कविता येथे देत आहे नक्की आवडेल सगळ्यांना... .... ......  ... .... ......... .... ......  ... .... ......  



तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
सुरुवात कधी झाली, पुढाकार कोणी घेतला
दिवस कोणता – तारीख काय? किती वर्ष झाली?
हे तपशील म्हटलं तर सार्थ आहेत
पण म्हटलं तर व्यर्थ आहेत, कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रोज भेटतो - असही नाही,
रोज फोन करतो - तर तसही नाही
एकमेकांकडे सारखे जातो येतो - असं तर नाहीच नाही
तरी पण स्नेहाचा बंध घट्ट आहे कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
चौऱ्यांशी लक्ष योनी हिंडून झाल्यावर
माणूस जन्म मिळाला म्हणे !
मागचा जन्म आठवत नाही, अन पुढचा दिसत नाही
पण खरं सांगू या जन्मात तुझ्याशिवाय करमत नाही कारण ...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
हल्ली वाढदिवस लक्षात ठेवायची स्टाईल आहे
एकमेकांचा, बायकांचा, मुलांचा, लग्नाचा
आणि कशाकशाचा ...
हे सारं आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं
पण हे सारं ठार विसरूनही, आपलं काही अडत नाही कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रिलेशनशिप हा आजचा परवलीचा (आणि गुळगुळीत) शब्द
रिलेशनची शिप, कुठलाही विचार न करता
लगेच पाण्यात ढकलायचे हे दिवस
बरेचदा मग ती गैरसमजांच्या खडकावर आपटून फुटतेच
आपल्या नात्याला असलं नावही नाही
आणि त्यामुळे गैरसमजांच्या खडकांना
त्याचं काम करायला वावही नाही कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
“मदत” शब्द आपल्या नात्याला गैरलागू आहे
कारण त्यातही “मद” आहेच
साद आली तर प्रतिसाद मिळतोच
हाक आली तर ओ येतेच
पण ती मारण्याची वेळच आपल्यावर येत नाही
त्याआधीच ओ येते कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे.


           आयुष्यात कोणावाचुन कोणाचे अडत नसते पण जर आपले मित्रच आपल्या सोबत नसतील तर आपले आयुष्य हे रंग नसलेल्या चित्रा सारखे पांढरेफटक होऊन जाईल. थोड़े असो वा जास्त असो जीवाभावाचे मित्र तुमच्या कड़े असतील तर तुम्हाला आयुष्यात कधीच काहीही कमी पडणार नाही .